माय महाराष्ट्र न्यूज:१ मार्चपासून सोशल मीडिया, बँक कर्ज, एलपीजी सिलिंडर आणि इतर गोष्टींबाबत मोठ्या बदलाची शक्यता आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
मार्चमध्ये कोणते नवीन नियम लागू होतील आणि ते तुमच्या मासिक खर्चावर कसा परिणाम करू शकतात ते जाणून घेऊयात.रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी त्यांचे
MCLR दर वाढवले आहेत. याचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. ईएमआयचा बोजा आणि कर्जाचे वाढते व्याजदर यामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ शकतो.एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीसाठी गॅसचे दर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला
निश्चित केले जातात. गेल्या वेळी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली नसली तरी यंदा सणासुदीच्या निमित्ताने दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सार्वजनिक केली जाऊ शकते. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्चपासून ५ हजार
मालगाड्या आणि हजारो प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते.मार्चमध्ये होळी आणि नवरात्रीसह १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये बँकांच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.भारत सरकारने अलीकडेच आयटी
नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. आता ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइट्सना नवीन भारतीय नियमांचे पालन करावे लागणार आहे.