माय महाराष्ट्र न्यूज: गेल्या काही आठवड्यांत संपूर्ण भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, ज्यामुळे लोकांमध्ये आणि साकारची चिंता वाढली आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्या डेंग्यूची साथ जास्त प्रमाणात पसरली आहे.
देशभरात गेल्या काही आठवड्यात एक लाखाहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरच्या महिन्यात उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाध्ये डेंग्यूच्या साथीला सुरूवात झाली होती.
सध्याचा डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तज्ज्ञांची टीम देशभरातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचे
अधिकारी त्या राज्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या वर्षी जास्त झालेला पाऊस आणि डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपुरे उपाय या संसर्गाच्या वाढीस कारणीभूत असू शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख
मांडविया यांनी दिल्लीत एका बैठकीच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सचिवांना डेंग्यूचे जास्त प्रकरण असलेल्या राज्यांमध्ये तज्ञांचे पथक पाठवण्याचे निर्देश दिले होते.ज्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संघ पाठवण्यात आले आहेत त्यामध्ये हरियाणा, पंजाब, केरळ,
राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन केले जाईल.