माय महाराष्ट्र न्यूज:समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचा इशारा एका संतप्त नागरिकाने दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील
शेतीच्या वादातून हा इशारा देण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून एका कुटुंबावर अन्याय होत असल्याची भावना, कुटुंबियांची आहे. अण्णा हजारे तसेच प्रशासनालाही निवेदने देऊन झाली, मात्र काही कारवाई
होत नसल्याचा आरोप सदर कुटुंबाने केलाय. अखेर १ मे महाराष्ट्र दिनाला अण्णा हजारेंचीच हत्या करणार असल्याचा इशारा या कुटुंबातील संतोष गायधने याने दिला.श्रीरामपूर तालुक्यातल्या निपाणी वडगाव इथल्या
संतोष गायधने यांनी अण्णा हजारेंची हत्या करणार असा इशारा दिलाय. शेतीच्या वादातून संगनमताने कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. शेतीच्या वादातून गटातील ९६ जणांनी कुटुंबावर दबाव
आणला असून खोट्या केस दाखल करून भीती दाखवण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं.कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगत आहे. यासंदर्भात अण्णा हजारेंसह वरीष्ठ पोलीस आणि मंत्र्यांनाही निवेदन दिलं आहे.
पण तरीही कारवाई होत नसल्यानं कुटुंबीय हतबल झालं आहे. राष्ट्रपतींकडे यामुळे आत्महत्येसाठी परवानगी मागितली असल्याचं संतोष गायधने यांनी म्हटलं. दरम्यान, अण्णा हजारे हे या प्रकरणात मॅनेज झाले असल्याचा आरोप गायधने यांनी केलाय.
तसंच 1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीत जावून हत्या करणार असा इशारा दिला.