माय महाराष्ट्र न्यूज:शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होणार
असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.विदर्भ आणि मराठवाड्यात 19 आणि 20 फेब्रुवारीला अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने नक्की कोणत्या जिल्ह्यात
पाऊस होणार असल्याचं सांगितलंय हे आपण जाणून घेऊयात.मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम,
बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
त्यामुळे रब्बी हंगामाला पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे. याआधीच अवकाळीमुळे बळीराजा कोलमडून पडलाय. आता पुन्हा अवकाळीनं धुमाकूळ घातला तर शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.