माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
नवाब मलिकांच्या अटकेला जवळपास महिना पूर्ण होत असून भाजपाने यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली असताना राष्ट्रवादीने मात्र त्यासाठी
नकार दिला असून सध्या त्यांची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे. यादरम्यान भाजपा आमदार श्वेता महाले यांनी गंभीर आरोप केला आहे.नवाब मलिकांनी मुंबईत, शिवसेना भवनात
बॉम्बस्फोट घडवून आणले. आणि त्याच नवाब मलिकांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे आले आहेत असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे. श्वेता महाले यांनी यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ज्या दिवशी
शिवसेना काँग्रेससोबत गेली त्याच दिवशी त्यांनी हिंदुत्वाला लाथ मारली असं त्या म्हणाल्या आहेत.शिवसेनेचे हिंदुत्व हे फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापुरतंच राहिलेलं आहे. ज्या दिवशी काँग्रेससोबत सत्तेत बसले, त्या दिवशी हिंदुत्वाला लाथ मारलेली आहे.
एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना संरक्षण दिलं जात असून योजना दिल्या जात आहेत. ज्या हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले, मोठे झाले ते हिंदुत्व मात्र पक्षप्रमुख विसरले आहेत अशी टीका श्वेता महाले यांनी केली आहे.
नवाब मलिक कोण आहेत…नवाब मलिक यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणलेत, शिवसेना भवनामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. त्या नवाब मलिकांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. यापेक्षा वेगळं
पाहण्याची गरज नाही. उद्याला एमआयएम जरी यांच्यासोबत आली तरी आश्चर्य वाटण्यासारखं त्यात काही नाही,” असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.शिवसेनेचे हिंदुत्व हे ढोंगीपणाचं आहे, ते फक्त बोलण्यामध्ये दिसतं, प्रत्यक्ष
कृतीमध्ये त्यांचं हिंदुत्व कुठेही राहिलेलं नाही. ते हिंदुत्व बाळासाहेबांसोबत निघून गेलं आहे,” असं श्वेता महालेंनी म्हटलं आहे.