माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात उन्हाचा चटका आता असह्य होत आहे. विदर्भात तापमानाचा पारा 45 अंशांपार गेल्याने उष्णतेची लाट आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 46.2 अंश
सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आजदेखील विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मात्र या उन्हाच्या चटक्यापासून काहीसा
दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे येथील तापमान 2 ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून आजपासून (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
या भागांत उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट)
विदर्भ : अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
आज या भागांत वादळी पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर,
मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड.
या भागांत उष्णतेची लाट,
ब्रह्मपुरी 46.2, चंद्रपूर 46, गोंदिया 44.8, वर्धा 44.8, जळगाव 44.3, अकोला 44.2, नागपूर 44.2, औरंगाबाद 41.4, नांदेड 43.2
बंगालचा उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ उद्या (ता. 4) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.
उत्तरेकडे सरकणारी हे वारे तीव्र होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यासह मध्यप्रदेश, तेलंगणाच्या काही भागातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.