माय महाराष्ट्र न्यूज :झाकिर नाईक संदर्भात तुम्ही लोकांना अटक करत आहात, मग राधाकृष्ण विखे-पाटील का सुटत आहेत? त्यांच्या कारखान्याची प्रकरण ही अत्यंत भयानक आहेत,
लवकरच ते मी एक्सपोझ करेन, असा इशाराही बुधवारी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारला दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. राऊत यांच्या या विधानाने आता नगर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
झाकीर नाईक ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे. त्याच्याकडून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या संस्थेला 4 ते 5 कोटी देण्यात आले आहेत, या प्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे नेते,
खासदार संजय राऊत यांनी केली आहे.तमिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर ईडीकडून कारवाई केली आहे. त्यानंतर ईडीने सेंथिल यांना अटक केली आहे. या प्रकरणावरून संजय राऊत यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी संजय राऊत यांनी संतापले. यावेळी ईडीच्या कारवाईबाबत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.दिल्ली, तामिळनाडूमध्ये आणि महाराष्ट्रात छापा टाकून मंत्र्यांना नेत्यांना अटक केली जाते आहेत. लवकरच दादा भूसे यांच्याविषयी
ईडीकडे तक्रार करणार आहे. सीबीआयकडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मी तक्रार केली होती. पुढच्या दोन दिवसांत ईडीकडे तक्रार करणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाणार आहे. 178 कोटी रुपये शेतकऱ्यांचे जमा केले. गिरणा सहकारी साखर कारखाना
बसवण्यासाठी हे पैसे गोळा केले. या पैशांचे मनी लाँड्रिंग झाले आहे असा आरोप राऊतांनी केला आहे.राहुल कुल, दादा भुसे, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गैरव्यवहारांबाबतची माहिती देऊन देखील कारवाई करण्यात येत नाही.
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबाबत आणखी माहिती ईडीला देण्यात येणार असून त्यांचा बचाव कधीपर्यंत करण्यात येणार असे राऊत म्हणाले.