माय महाराष्ट्र न्यूज:ज्यांना त्यांच्या विवाहात अनेक अडचणी येतात. त्यांचे लग्न जुळता-जुळता तुटते आहे. अशा मुलींनी गुप्त नवरात्रीत माँ दुर्गाला श्रृंगार सामान अर्पण करावे. यासाठी आंघोळ आणि ध्यान
केल्यानंतर लाल रंगाचे कपडे परिधान करून माँ दुर्गेची भक्तिभावाने पूजा करावी आणि श्रृंगार वस्तू भेट द्याव्यात.वैवाहिक जीवनात अडथळा येत असेल तर गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून पुढील 40 दिवस माता कात्यायनीची
पूजा करावी. पूजेदरम्यान ‘ॐ कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरि’ या मंत्राचा जप करा. यामुळे लवकरच लग्न होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला योग्य वर मिळेल.आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी उदया तिथीनुसार 19 जून आहे.
या दिवशी नवरात्रीची सुरुवात होत आहे. या दिवशी पहाटे 5.23 ते 7.27 हा काळ कलश स्थापनेसाठी शुभ मानला जातो.हिंदू धर्मात कोणताही सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आषाढ महिन्यात होणारे गुप्त नवरात्री जवळ आली आहे. परवा 19 जूनपासून
नवरात्रीची सुरूवात होत आहे. याबाबत ज्योतिषाचार्य सांगतात की, ज्या मुलींना विवाहात अडचणी येत आहेत त्या नवरात्रीच्या काळात काही उपायांनी या समस्येवर मात करू शकतात.