Thursday, October 5, 2023

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ;आज मिळाला हा भाव

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कांद्याच्या दरामध्ये सातत्याने होत असलेली घसरण‎ शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडवून टाकण्यास‎ कारणीभूत ठरली आहे. एक नंबर कांद्याला फेब्रुवारी‎ ते मे अखेर पर्यंत

प्रतिक्विंटल जास्तीत जास्त ९००‎ पर्यंतचा दर मिळाला. तर तीन नंबर कांदा शंभर रुपये‎ क्विंटल दराने विकला गेला. चार महिन्याच्या‎ प्रतीक्षेनंतर गावरान कांद्याला १४०० रुपये पर्यंतचा भाव‎ मिळत आहे.

राज्यात अहमदनगरला प्रमुख कांदा उत्पादक‎ जिल्हा म्हणून ओळखले जाते. सरकारने एक‎ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत कांदा विक्री‎ केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपयांचे‎ अनुदान घोषित केले.

परंतु मार्चनंतरही कांद्याचे दर‎ समाधानकारक वाढलेच नाहीत. मे अखेरपर्यंत एक‎ नंबरचा कांदा ५०० ते ९०० रुपये दरानेच घेतला गेला.‎ वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी‎ पुन्हा एकदा पावसाळ्यापूर्वी कांदा चाळीत भरला.‎ तसेच अतिवृष्टीमुळे

कांद्याचे नुकसान झाल्याने‎ आवकही घटली . जूनच्या पहिल्या आठवड्यापासून‎ मात्र कांद्याच्या दरात किरकोळ वाढ झा ली. चार‎ जूनला कांदा ११७५ रुपये प्रतिक्विंटल त्यानंतर १३‎ जूनला राहुरी बाजार समितीत १४०० रुपये प्रति‎ क्विंटल दर मिळाला.‎ वांबोरी उप बाजार

आवारात १७ जूनला वांबोरी उप‎ बाजारात १३ हजार ४०० गोणी कांद्याची आवक‎ झाली. लिलावात एक नंबर कांद्याला १००० ते १३००‎ चा भाव मिळाला. दोन नंबर कांदा ६०५ ते १००० तर‎ तीन नंबर कांदा १०० चे ६०० रुपये दराने विकला गेला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!