माय महाराष्ट्र न्यूज: भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये जो विकासाचा मॉडेल उभा केला आहे.
त्यामुळे येत्या निवडणुकीत कर्तव्य शून्य राजकारणी भुईसपाट होणार असे विधान भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी जयंत देशमुख यांनी केले आहे.
जयंत देशमुख पुढे बोलताना म्हणाले की देशात आणि महाराष्ट्रात गुलाबी वादळाची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काही कर्तव्य शून्य राजकारणी कावरेबावरे झाले आहे. हे कर्तव्य शून्य राजकारणी येत्या काळामध्ये भुईसपाट होणार आहेत.
भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मागील नऊ वर्षांमध्ये जे तेलंगणा मॉडेल स्थापित केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे.
येत्या काळामध्ये तेलंगणा मॉडेल हे संपूर्ण देशामध्ये शेतकरी व जनतेच्या उद्धारासाठी काम करणार आहे.माझी सर्व जनतेला विनंती आहे, की तुम्ही सर्वांनी एक निर्धार घ्यावा आणि येत्या
निवडणुकीत देशात व महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार आणावे असे जयंत देशमुख यांनी सांगितले.