नेवासा
नेवासा तालुक्यात मागील वर्षी अतिवृष्टिने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी
जीवन ज्योत फाऊंडेशनच्या वतीने नेवासा तहसीलदार कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.खासदार सदाशिव लोखंडे व तहसील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
जीवन ज्योत फाऊंडेशनचे अध्यक्ष कमलेश नवले यांचे नेतृत्वाखाली
नेवासा तहसीलदार कार्यालयात हे अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
खासदार सदाशिव लोखंडे व तहसील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,
मागील वर्षेी अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे कपाशी,तुर,बाजरी,मका,व फळ बाग या पिकांचे नुकसान झाले होते.सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते.अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्धमेला झाला आहे.त्यात उशीरा का होईना बळीराज्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली आणि मागील वर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकाची भरपाई मंजूर होऊन ही यादीमध्ये नावे येऊन ही नुकसान भरपाई आली नसून शेतकरी वर्गात नाराजी आहे. त्यामुळे त्वरित नुकसान भरपाई जमा करावी. नुकसान भरपाई नाही आली तर येत्या ८ दिवसात भेंडा येथे ठिकाणी चक्काजाम व नग्न आंदोलन करण्यात येईल.
या वेळी कमलेश नवले,छञपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर,प्रदिप आरगडे,अक्षय बोधक,राहुल कांगुणे,प्रकाश मुळक,संजय ठुबे,आप्पासाहेब आरगडे,अभिजीत बोधक,शुभम आरगडे,राम आरगडे,संजय ऊरे,राजू गायकवाड,सागर नवथर,निलेश शिंदे,आम आदमी पार्टीचे संदिप आलावणे,करिम सय्यद,कृष्णा आरगडे यांचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.