माय महाराष्ट्र न्यूज:रिलायन्स जिओने देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्कच्या चाचणीला सुरुवात केली आहे. यासाठी रिलायन्स जिओने जगातील बड्या कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार सध्या मुंबईत रिलायन्स जिओ स्वत:च्या बळावर 5G चाचण्या करत आहे.
तर पुण्यात रिलायन्सकडून नोकिया कंपनीची मदत घेतली जात आहे. तर दिल्ली आणि गुजरातमध्ये जिओकडून अनुक्रमे एरिक्सन आणि सॅमसंगच्या मदतीने संयुक्तपणे 5G नेटवर्कच्या चाचण्या सुरु आहेत.रिलायन्स जिओपूर्वी भारती एअरटेलने गुडगावमध्ये 3500 मेगाहर्ट्ज मिड-ब्रांड स्पेक्ट्रमच्या सहाय्याने 5G टेस्टिंगला सुरुवात केली होती.
दूरसंचार विभागाकडून एअरटेलला मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि दिल्ली या भागांसाठी स्पेक्ट्रम वितरीत करण्यात आले होते.तर दुसरीकडे रिलायन्स जिओनेही 57,123 कोटी रुपये खर्च करुन 22 सर्कलमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत.याशिवाय, हैदराबादमध्येही रिलायन्स 5G चाचणीसाठी तयारी करत आहे.
मात्र, त्यासाठी तंत्रज्ञान भागीदार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. देशात 5G नेटवर्क व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध करुन देण्यापूर्वी या चाचण्या रिलायन्स जिओसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जात आहेत.
यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. कारण केंद्र सरकारने अजूनही 5G नेटवर्कसाठी लागणारा परवाना आणि लहरींचा (स्पेक्ट्रम) लिलाव केलेला नाही.