भेंडा(वार्ताहर):– जीवनातील सर्व अडचणी, दुःख दूर होण्यासाठी तसेच प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी सर्वांनी श्रीमद भागवत कथा ऐकली पाहिजे.
श्रीमद् भागवत कथा ही आपल्याला जीवनात बदल घडविण्यासाठी आणि सर्व व्यथा दूर करण्याचे साधन आहे असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे उत्तरअधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज यांनी केले.
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त श्रीराम सेवा मंडळ आयोजित भागवताचार्य स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांचे श्रीमद भागवत कथेस दि १६ एप्रिल पासून सुरुवात झाली.
कथेचे १ ले पुष्प गुंफतांना भागवताचार्य प्रकाशनंदगिरी महाराज पुढे म्हणाले, भागवत पुराणात १२ स्कंध, ३३५ अध्याय व १८ हजार श्लोक आहेत. अंत:करणाची शुध्दी करण्यासाठी श्रीमद भागवत सारखा दुसरा ग्रंथ नाही.जीवनात आपण भागवत कथा ऐकली पाहिजे, भंगवताची सेवा केली पाहिजे.
भागवत महात्म, नारद भक्ति संवाद ,धुंधकारी उद्धार याविषयावर निरुपम केले .नागेबाबा संस्थानचे अंकुश महाराज कादे, बाळकृष्ण महाराज कानडे, शुभम महाराज बनकर उपस्थित होते. कथेनंतर मंगल आरती करण्यात आली. कथेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.