Monday, May 12, 2025

आज नगर जिल्ह्यात विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता;यलो अलर्ट जारी

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने आणि त्याचबरोबर ईशान्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव वाढत असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.

पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, या भागांमध्ये यलो अलर्ट जारी

करण्यात आला असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.आज (ता. १६) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि नगर या जिल्ह्यांमध्ये विजांसह

मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वादळी वाऱ्यांसह पाऊस होणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यात काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. परंतु, या भागांमध्ये पाऊस फारसा मोठ्या प्रमाणात होणार नाही, असे हवामान विभागाचे मत आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी आणि पावसाच्या अंदाजानुसार उपाययोजना कराव्यात.

राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, नगर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी विजेपासून

सावधगिरी बाळगावी, असे सूचित केले आहे. विजा चमकत असताना घरात सुरक्षित राहणे आवश्यक आहे, असे हवामान तज्ञांनी सांगितले आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही

भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!