Saturday, August 2, 2025

भंडारदरा धरण शताब्दी महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/सुखदेव फुलारी

अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची जीवनरेखा समजले जाणारे भंडारदरा धरण (आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय) शतक महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने या जलाशयाच्या संवर्धनासाठी व या भागातील निसर्ग पर्यटनाला संधी निर्माण करुन देण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी आणि त्यानुषंगाने सर्व संबंधित प्रशासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधून त्यांच्याकडील कामांचा आढावा घेण्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित
करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने यबाबद दि.१ ऑगस्ट रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
त्यात म्हंटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची जीवनरेखा समजले जाणारे भंडारदरा धरण (आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय) अहिल्यानगर येथे प्रवरा नदीवर ब्रिटिश काळात सन १९१० ते १९२६ या कालावधीत बांधण्यात आले असून या धरणास सन-२०२६ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. नैसर्गिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्या अकोले तालुक्यातील भूमीमध्ये भंडारदरा धरणाची निर्मिती झाल्याने या भागातील अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा या तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याचा परिणाम या भागातील शेती, सहकार आणि औद्योगिक प्रगतीवर झाला आहे. तसेच, यामुळे अहिल्यानगर जिल्हयाचा आर्थिक विकास झालेला आहे.
भंडारदरा धरणाला लाभलेल्या ऐतिहासिक, नैसर्गिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीचा विचार करता या धरणाचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्याकरिता उपाययोजना सुचविण्यासाठी भंडारदरा धरण शताब्दी महोत्सव समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुसार शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

भंडारदरा धरणाच्या (आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय) शतक महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने या जलाशयाच्या संवर्धनासाठी व या भागातील निसर्ग पर्यटनाला संधी निर्माण करुन देण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी आणि त्यानुषंगाने सर्व संबंधित प्रशासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधून त्यांच्याकडील कामांचा आढावा घेण्याकरिता मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे.

अध्यक्ष-मुख्यमंत्री, सदस्य:- उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), मंत्री (जलसंपदा) (गोदावरी व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ),मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई,अपर मुख्य सचिव (जलसंपदा), मंत्रालय, मुंबई,अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई, सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
*सदस्य सचिव:–कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर

*समितीची कार्यकक्षा :-
१) भंडारदरा प्रकल्पाचा शताब्दी महोत्सव साजरा करताना या जलाशयाच्या संवर्धनासाठी तसेच या भागातील निसर्ग पर्यटनाला संधी निर्माण करून देण्याबाबतच्या प्रस्तावांची अंमलबजावणी विहित कालावधीत पूर्ण होण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुचविणे.
२) भंडारदरा प्रकल्पाच्या शताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने करावयाच्या कामांचा वेळोवेळी आढावा घेणे.
३) सर्व संबंधीत प्रशासकीय विभाग यांच्याशी वेळोवेळी समन्वय साधून कामाच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडीअडचणी सोडविणे, संबंधितांना मार्गदर्शन करणे.
४) समितीच्या रचनेत समाविष्ट असलेल्या समितीमधील सदस्यांव्यतिरिक्त जलसंपदा विभाग व इतर विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना बैठकीकरीता आमंत्रित करण्याची मुभा समितीस राहील.
५) उपरोक्त समितीने सहा महिन्यांच्या कालावधीत शासनास अहवाल सादर करावा.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!