Wednesday, February 11, 2026

चुकीची जीवन शैली हेच आजारांचे मुळ-डॉ.मिलिंद सरदार

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/सुखदेव फुलारी

असंतुलित आहार,व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव हे तीन महत्त्वाच्या गोष्टी अख्या जगामध्ये आजार पसरण्याची मुख्य कारणे आहेत.चुकीच्या जीवन शैली हेच आजाराचे खरे मुळ असल्याचे प्रतिपादन मोटिवेशनल हेल्थ स्पीकर (आरोग्य प्रेरक) डॉ.मिलींद सरदार यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे रविवार दि.८ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ वाजता नागेबाबा परिवार व माधवबाग प्रणित संजीवनी आयुष हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आरोग्यावर बोलू काही’ या व्याख्याना प्रसंगी डॉ.सरदार बोलत होते. नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे, काशिनाथ नवले,डॉ.नारायण म्हस्के, अशोकराव मिसाळ,डॉ.शिवाजी शिंदे,बबनराव धस, बाळासाहेब नवले, गणेश गव्हाणे, अशोक वायकर, आबासाहेब काळे, अजित रसाळ, सुभाष चौधरी, संजय नवले यांचेसह नागेबाबा परिवाराचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

डॉ.सरदार पुढे म्हणाले की, मधुमेह,हृदयरोग,रक्तदाब हे सगळे चुकीचे जीवनशैलीचे आजार आहेत.
ते कायमचे जातील अशी एक गोळी
अजून बनलेली नाही.मात्र जर आज पासून तीन महिने आपण जीवनशैली बदलली तर संशोधन असं सांगते की १०० टक्के तुम्ही तुमचा आजार ९० दिवसात बरा करू शकता.
उंचीच्या प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढले तर शरीराचे सर्व अवयवाच्या काम करण्यामध्ये बिघाड होतो आणि यालाच आपण बीपी, डायबिटीस, थायरॉईड, अंगदुखी, डोकेदुखी, कंबर दुखी असे म्हणतो.

सर्व आजार पोटातूनच सुरू होतात.
त्यामुळे कमी खाणे जास्त चांगले असते, जेवतांना अर्ध पोटी असावे.
अज्ञानापोटी सगळं आजार आपल्या किचन मधून येतात.त्यामुळे सात्विक आहार महत्वाचा आहे.भूख लागेल तेवढंच आणि भूख लागेल तेंव्हाच खावे.सकाळी पोटभर नाश्ता, दुपारी सकस जेवण आणि रात्री हलके अन्न घ्यावे. जेवण प्यावे आणि पाणी खावे म्हणजे अन्न चावून चावून पाण्या सारखे पातळ करून घ्यावे तर पाणी घोट घोट प्यावे. जिभेला नियंत्रित ठेवावे.जेवण व झोप या मध्ये तीन तासाचे अंतर ठेवावे.
यामुळे रेशन, अन्न शिजवण्याचा त्रास व गॅस वाचेल आणि डॉक्टरी खर्च ही १०० टक्के वाचेल.

शारीरिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी
शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक हे पाच महत्त्वाचे स्तर आहेत. या पाच स्तरांचा समतोल राखल्यास सर्वांगीण आरोग्य सुधारते आणि जीवन आनंदी व उत्साही राहण्यास मदत होते.दररोज अर्धा ते पाऊण तास नियमित व्यायाम करावा.आहार,विहार आणि विचार सांभाळणे गरजेचे आहे.

रक्तवाहिन्यातील ब्लॉकेज मुळे नाही तर रक्तवाहिन्यातील गाठीमुळे मात्र हृदय विकाराचा झटका नक्की येऊ शकतो.९० टक्के हे मानसिक विकार आहेत.पंचकर्माने शरीर शुद्धी होते. पंचकर्माने हृदय बायपास शस्त्रक्रियेला कायमचे बायपास करता येते.

राजेंद्र चिंधे यांनी प्रास्ताविक केले.प्रा.सविता नवले यांनी सूत्रसंचालन केले.सुनील गव्हाणे यांनी आभार मानले

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!