Thursday, February 12, 2026

विधानसभा आचार संहिते पूर्वी त्रिपक्ष समिती गठीत करा;साखर कामगारांची साखर आयुक्तांकडे मागणी

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

पुणे/प्रतिनिधी

राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या कराराची मुदत संपून ७ महिन्यांचा कालावधी लोटला तरी ही
त्रिपक्ष समिती गठीत करणेबाबद शासन उदासीन असल्याने चित्र दिसून येत आहे.विधानसभा आचार संहिते पूर्वी त्रिपक्ष समिती गठीत करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनने साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांचे कडे केली आहे.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार  फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी,अशोकराव मिसाळ, संभाजीराव माळवदे,संजय राऊत, आप्पासाहेब शिंदे,राहुल टिळेकर, रमेश यादव
यांचे शिष्टमंडळाने सोमवार दि.30 सप्टेंबर 2024  रोजी  साखर आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात म्हंटले आहे की,राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या कराराची मुदत दि. ३१ मार्च २०२४ रोजी संपल्यामुळे दि. १ एप्रिल २०२४ पासून राज्यातील साखर उद्योगातील व जोड धंद्यातील कामगारांच्या वेतनात वाढ व सेवाशर्तीत बदल होण्यासाठी त्रिपक्ष समिती तातडीने गठीत करण्यासाठी आपणास दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी नवीन मागण्यांची नोटीस दिलेली  आहे.
तसेच साखर कामगरांच्या मागण्या व प्रश्नावर चर्चा करणेसाठी राज्याचे  सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत    बुधवार दि.७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता  मंत्रालयामध्ये मंत्री महोदयांच्या
दालनात कामगार संघटनांचे  प्रतिनिधी व संबंधीत विभागाचे अधिकारी  यांची बैठक  झाली.या बैठकीला  महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक,सरचिटणीस नितीन पवार,कामगार नेते आ.भाई जगताप यांचेसह  साखर आयुक्त,कामगार आयुक्त व इतर कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत  सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी त्रिपक्षीय समिती गठीत करण्याबाबत कामगार आयुक्त व साखर आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याबाबत सांगितले. त्याचबरोबर साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतर पुन्हा एकदा साखर कामगार नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन पुढील बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते.
या बैठक होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असून
साखर कामगारांचे नवीन वेतनवाढ व सेवाशर्ती ठरविण्यांसाठी   त्रिपक्षीय समिती गठीत करणे बाबद शासन पातळीवर आज पर्यंत कुठलीच हालचाल होतांना दिसून येत नाही.
तरी आपण स्वत: लक्ष घालून  विधानसभा निवडणूक आचार संहिता लागण्यापूर्वी त्रिपक्षीय समिती तातडीने गठीत होण्याचे दृष्टिने
कार्यवाही करावी अशी मागणी केली.

         

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!