Monday, May 13, 2024

महापारेषणच्या ठेकेदाराने शेतकर्‍यावर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करण्यासाठी वचिंतचे धरणे आंदोलन सूरु

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

विश्वविंड ते भेंडा 220 केव्ही महापारेषणचे अति उच्च दाब वीज वाहिनी मनोरे व तारा ओढणेचे कामात अटकाव केल्या प्रकरणी महापारेषणच्या ठेकेदाराने पोलिस हाताशी धरुन सौंदाळा व राजनगाव येथील पत्रकार व शेतकर्‍यावर दाखल खोटे गुन्हे रद्द करण्यात या मागणी साठी वचिंतचे बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन सूरु केले आहे.

आंदोलन कर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीचे बेकायदेशीरपणे अनधिकृतपणे जमिनीचे अधिग्रहण (भुसंपादन) न करता २२० केव्ही विश्वविंड ते भेंडा लाईन अतिउच्च दाब वीज वाहिनी मनोरे व तारा उभारणी करताना शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन त्यांचे खोटे कागदपत्र बनवून फसवणूक केलेली आहे हे काम करताना उपविभागीय अधिकारी भाग नगर अहमदनगर यांनी यांच्या संगनमताने शेतकऱ्याची शेतजमीन अधिकृत अधि ग्रहण न करता त्याला गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून त्याच्या शेतात अति धोकादायक अतिउच्च दाबाचे विजेचे टावर उभारलले आहेत व उपविभागीय अधिकारी (श्रीनिवास अर्जुन) यांनी दि.२०/११/२०२० च्या आदेशानुसार शेतक-याच्या शेतजमिनीत धोकायाक टॉवर्स उभारण्या कामी जे आदेश दिलेले होते त्या आशेशानुसार शेतक-यांची शेतजमीन कुठल्याही प्रकारचे जमीन अधिग्रहण न करता त्याच्या सातबारा उततन्यावर कुठल्याही प्रकारची नोंद न करता त्याच्याकडून ती शेत जमीन त्याला शासकीय धाक दाखून तू जर जमीन दिली नाही तर तुण्यावर आम्ही आदेश भंग कल्याचा गुन्हा दाखल करू या सर्व कारणामुळे शेतक-याची शेती अतिउच्च दाबाची लाईट असल्याने त्याच्याखाली कुठल्याही प्रकारची शेती घेता येत नाहीत जनावरे नेता येत नाहीत. मशागत करता येत नाही. शेताला पाणी देता येत नाही. ट्रैक्टर सारखी वाहने पण तिथे नेने धोक्याचे ठरते. शेतक-याला प्रचंड संकटाला सामोरे जावे लागते व जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे तरी या पारेषण कंपनीने अधिग्रहण केलेल्या संपूर्ण क्षेत्राची व त्याच्या सातबारावर असलेल्या नोंदीची संपूर्ण रक्कम अदा करावी ही रक्कम जर अदाकरण्यात नाही आली तर आम्ही आज पासुन सामने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी तहसीलदार साहेबांच्या कार्यालयासमोर बंधीत बहुजन आपाही व शेतवारी धरणे आंदोलनास बसलो आहोत याची सर्वस्व जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी.

भविष्यात यापुढे शेतकरी आणि महापारेषण चे ठेकेदार बळजबरीने बेकायदेशीर पणे जर शेतकऱ्यांच्या जीवितहानी झाल्यास महापारेषण चे ठेकेदार व पोलीस यांना जबाबदार धरण्यात यावे ज्या बाधित क्षेत्रामधून ही अति धोकादायक अती उच्च दाब वीज लाईन जाते त्या पूर्ण जमीनीचे मूल्य मातीमोल होते ती बाधित जमीन कुणीही विकत घेण्यास तयार होत नाही या प्रकल्पासाठी जी शासकीय कमिटी नेमलेली आहे त्यांच्याकडून देण्यात येणारा मोबदला एकदम तटपुंजा असून तो आम्हाला मान्य नाही.अशा प्रकारे अनेक गंभीर धोक्यांकडे उपविभागीय अधिकारी अहमदनगर यांनी डोळे झाक करून हा आदेश महापारेषण च्या ठेकेदारांना बक्षीस दिलेला होता तो रद्द करण्यासाठी व पञकार,शेतकर्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करण्यात साठी वंचित बहुजन आघाडी नेवासा पक्षा तर्फे तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.या वेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष पोपट सरोदे, किरण सरोदे, दामोदर शिंदे, बबन आल्हाट,एकनाथ राऊत,योगेश गायकवाड,आकाश इगळे, ञिंबक भदगले, शिवाजी शिरसाठ,बाळासाहेब शिरसाठ,संजय ठुबे,लक्ष्मण पेहरे,जनार्दन शिंदे,अशोक आरगडे,महेश ठुबे,निलेश शिंदे,संभाजी बारे,आप्पासाहेब आरगडे,अक्षय बोधक,सुखदेव पाडळे आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
शेतकरी संघटना,जीवन ज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र,छञपती युवा सेना अहमदनगर,सत्यमेव जयते प्रतिष्टान या संघटनानी आंदोलनास जाहिर पाठिंबा दिला.

*कमलेश नवले…
शेतकर्यांची आपल्या हक्काची नुकसान भरपाई मागणे गुन्हा आहे का? मध्यरात्री पोलीस प्रशासनाला हाताशी धरून पञकार सह शेतकर्यांवर खोटे गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी…

*जैद शेख...
महापारेषन सूडबुद्धीने सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे. लोकशाहीचे चौथा स्तंभ समजले जाणारे पत्रकार ही यात जाणीवपूर्वक गुंतवले गेले आहे. गुन्हे रद्द न झाल्यास आम्ही आक्रमकपणे आंदोलन करू.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!