Friday, April 19, 2024

अजय बारसकरचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले; जरांगेंचा खळबळजनक दावा

IMG-20240312-WA0002
IMG-20240411-WA0003
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठा आरक्षणाची लढाई निकराने सुरु ठेवणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी नुकतेच गंभीर आरोप केले होते. मनोज जरांगे हा खोटारडा व्यक्ती आहे,

ते रोज पलटी मारतात. मराठा आंदोलन सुरु असताना जरांगे आणि राज्य सरकारमध्ये गुप्त बैठकी झाल्या होत्या, असे आरोप बारसकर यांनी केले होते. त्यांच्या या आरोपांना मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर देताना

काही खळबळजनक दावे केले आहेत. अजय बारसकर हा महाराज वगैरे नाही. त्याच्या गावातील लोक बारसकर याने महिलांवर बलात्कार केल्याचे सांगतात. अशाच एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात बारसकर अडकला होता. ते प्रकरण सरकारकडून

दाबले गेले. तू जरांगेंविरोधात बोल नाहीतर तुझं प्रकरण उघड करु, अशी धमकी अजय बारसकर यांना देण्यात आल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. ते गुरुवारी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजय बारसकरला विकत घेतला आहे, तो एक सापळा आहे. अजय बारसकर बच्चू कडू यांच्यासोबत यायचा. ज्या माणसाला सोशल मीडियावरही काडीची किंमत नाही त्याच्यासोबत आज मुंबईतील चॅनल्स

तास-तासभर बोलत आहेत. सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य आहे का?, असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला. अजय बारसकरने अनेक भानगडी केल्या आहेत. त्याने एका संस्थानाच्या नावाखाली लोकांकडून ३०० कोटी

जमा केले होते. दुसऱ्या गावात भिशीचे पैसे घेऊन तो पळाला होता. आता तो मरणार आहे. फक्त त्याला तुकाराम महाराजांचे नावाखाली सहानुभूती घेऊन मरायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

मी उपोषणाला बसलो होतो तेव्हा मी माझ्या तंद्रीत होतो. त्यावेळी माझी चिडचिड होत असताना मी काही बोलून गेलो असेन तर मी तुकाराम महाराजांसमोर नाक घासायला तयार आहे.

मी आंदोलन संपल्यानंतर त्याबद्दल पश्चाताप व्यक्त करेन. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होण्यात काय अडचण आहे, असे जरांगे यांनी म्हटले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!