Thursday, May 2, 2024

भाजपाची दिल्लीत बैठक , महाराष्ट्रात कुणाकुणाची उमेदवारी फिक्स? वाचा..

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काल रात्री अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. भाजपची दिल्लीत

आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार,

आमदार आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेले आहेत. या बैठकीआधी भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय

निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय

निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 25 जागांवर चर्चा झाली आहे. भाजपच्या विद्यमान 25 जागांवर आजच्या बैठकीत चर्चा झालीय. त्यानंतर आता उद्या भाजपची उमेदवारांची दुसरी यादी येण्याची

शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, प्रामुख्याने 25 जागांवर

चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.भाजपच्या काल रात्रीच्या बैठकीत नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळण्याची

शक्यता आहे. तर जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सांगलीतून

संजयकाका पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दिंडोरीतून उमेदवारी

देण्याबाबत चर्चा झालीय. एकूण 25 जागांवर चर्चा झाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या आजच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांकडून

राज्यातील 25 जागांबाबतचं सादरीकरण करण्यात आलं आहे. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी भाजप ज्या मतदारसंघातून निवडणूक लढली होती, त्यापैकी जिंकलेल्या 23 आणि पराभवी झालेल्या

चंद्रपूर आणि बारामती अशा 2 जागांचं सादरीकरण आजच्या बैठकीत करण्यात आलं. चंद्रपूरच्या जागेवर सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं जाऊ शकतं. तर बारामतीची जागा

अजित पवार गटाला दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!