Sunday, May 5, 2024

शिर्डीच्या आजी – माजी खासदारांबाबत भाजपाच्या नितीन उदमलेंचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. सातत्यानं या मतदारसंघाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असते. सध्या या लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे सदाशिव लोखंडे आहेत. 2019 च्या लोकसभा

निवडणुकीत ते शिवसेनेकडून निवडून आले होते. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर लोखंडेंनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला होता.

दरम्यान आता शिंदे गटाकडून खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे. प्रचार सुरू झाला आहे.पण आजी माजी खासदारांबाबत नाराजी दिसून येत आहे. खासदार लोंखडेंच्या उमेदवारींला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आहे.

परंतु लोंखडेंना पुन्हा उमेदवारी दिली आहे.अजून एक विरोध लोखंडेना बघायला समोर येत आहे . भाजपाचे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी उपमुख्य कार्यकरी अधिकारी नितिन उदमले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

नितीन उदमले यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की महर्षी अगस्ती, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, श्री शनी महाराज, सद्गुरू साईबाबा, सद्गुरू गंगागिरी महाराज, सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या पावन भूमी मधे दोन्ही आजी माजी खासदारांनी एकमेकांवर आरोपांची राळ उडवून

प्राचाराचा जो चिखल केला आहे व त्यात ते दोघे यथेच्छ लोळत आहेत सामान्य नागरिक म्हणून हे सर्व क्लेशकारक आहे. पु. गोविंददेव गिरीजी, पु. भास्करगिरीजी महाराज, पु. रामगिरीजी महाराज यांनी आयुष्यभर कष्ट झेलून तयार केलेली ही वारकरी समाजाची भूमी आपल्या विचार व कृती दारिद्र्यामुळे बदनाम होत आहे .

याची जाणीव या दोन्ही आजी माजी खासदारांना नाही, याचा राग येऊ लागला आहे.वास्तविक, आपआपल्या कार्यकाळात झालेली कामे व भविष्यातील योजना सांगणे अपेक्षित असताना, आरोप प्रत्यारोप करून मुळ विकासाच्या मुद्द्यावर चर्चाच होऊ नये, अशी व्यवस्था दोघेही लावत आहेत.

स्व.ना.अण्णासाहेब शिंदे, स्व.ना. बाळासाहेब विखे पाटील, स्व.खा. शंकरराव काळे साहेब यांनी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघाची पक्षीय अपरिहार्यतेमुळे फरफट होत आहे असे वाटते. राज्याचे नेते म्हणून या राखीव मतदारसंघातील 18 लाख सन्मानीय मतदारांना या दोन महाभागांच्या हवाली करू नये एवढीच नम्र विंनती असे पत्र उदमले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!