Thursday, February 12, 2026

खासदारकीला झालेल्या पराभवामुळे ‘ते’ घाबरलेले ;माजी आ. मुरकुटे यांची विखेवर टीका

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गणेश सहकारी साखर कारखाना तसेच खासदारकीला झालेल्या पराभवामुळे ते घाबरलेले आहेत. त्यामुळे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे त्यांनी जास्तीचे पैसे सभासदांना दिले, अशी घाणाघाती टिप्पणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली.

अशोक कारखान्याची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर होऊन पार पडली. यावेळी ते बोलत होते.ऊस भावासंदर्भात अनेक सभासदांनी प्रवरा, संगमनेरचे उदाहरण देत 300 ते 500 रुपये देवून दिवाळी गोड करण्याचे आवाहन केले होते.

हाच धागा पकडत मुरकुटे यांनी प्रवरा कारखान्याच्या कारभाराचे वाभाडे काढत, प्रवरेची खरी परिस्थिती माहिती नसताना तुलना कशासाठी करता, असा प्रश्न उपस्थित केला. ज्या प्रवरेला 2020-21 मध्ये 170 कोटी तोटा होता, तोच कारखाना 2021-22 मध्ये 30 कोटी नफ्यात कसा आला. साखर कारखान्याला एका वर्षात 200 कोटी नफा कसा होऊ शकतो.

ते महसूलमंत्री काहीही करू शकतात. त्यांचा काटा तपासायला कोण जाणार, कोणता अधिकारी हिम्मत करेल. प्रवरेत गॅमन कंपनीचा को-जनरेशन प्रकल्प होता. मात्र, ही कंपनी दिवाळखोरीत आल्याने सेंट्रल बँकेकडून लिलावात प्रवरेने हा प्रकल्प विकत घेतला. त्याचे कर्ज प्रवरा बँकेकडे वळविले. त्यानंतर जिल्हा

बँकेकडून 70 कोटींचे कर्ज घेतले. त्यातून ही पतपैशाची उधळपट्टी सुरू आहे. सत्ता असल्यानंतर ते काहीही करतात. त्यामुळे प्रवरा काही आदर्श कारखाना नाही.संजीवनी, कोळपेवाडी व संगमनेर हे दारू तयार करणारे कारखाने असल्याने ऊसभावाशी त्यांची बरोबरी आम्ही करू शकत नाही.

तुम्हाला तुलनाच करायची असेल तर मुळा, ज्ञानेश्वर बरोबर करा असे मुरकुटे यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!