Tuesday, February 17, 2026

महाराष्ट्राच्या राजकारणात धमाका: हा पक्ष प्रत्येक मतदारसंघात ३००-४०० उमेदवार उभे करणार?

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पक्ष आपल्या छोट्या मित्रपक्षांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू म्हणाले की, लोकसभा

निवडणुकीसाठी आजपर्यंत त्यांच्याकडे चर्चेचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे आपण महायुतीत आहोत की नाही हे कळत नाही. त्यांना एकत्र ठेवायचे की नाही हे भाजपने ठरवायचे आहे.

नाहीतर मैदानात उतरायला आम्ही सक्षम आहोत. आम्ही प्रत्येक मतदारसंघात किमान ३००/४०० उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहोत. यासोबतच बच्चू कडू यांनी युती न झाल्यास मी खासदार मोहीम राबवणार असल्याचे जाहीर केले.

नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना कडू म्हणाले,”सध्या लोकसभेच्या जागांच्या संदर्भात आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच जागांबाबत आमच्याकडून

कोणत्याही सूचना मागवण्यात आलेल्या नाही. कदाचित त्यांना आमच्याशी बोलण्याची गरज वाटत नाही. आम्ही कमी पडत आहोत म्हणून भाजप आमच्याशी चर्चा करत नाही. ते पुढे म्हणाले

भाजप जागावाटपासाठी नेतृत्व करत आहे. म्हणून छोट्या पक्षांना विचारण्याची जबाबदारी त्यांची आहे. मात्र, छोट्या पक्षांच्या मागण्या जाणून न घेणे आणि त्यांच्या मतांकडे लक्ष न देणे हे भाजपचे इतिहास आहे.

राज्यात महायुतीच्या सत्तेबाबत बोलताना कडू म्हणाले,“भाजपने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. आम्ही १० पावले उचलू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा विश्वास आहे.

२० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आमची खूप बदनामी झाली. पण सरकारमध्ये काम झाले. अपंग मंत्रालयाच्या स्थापनेबद्दल मी समाधानी आहे. सरकार बनवण्यात आमचा मोठा वाटा आहे.

आम्ही सरकार स्थापन केले. भाजप आमच्याकडे आला. आम्ही शिंदे यांच्यासोबत आहोत,भाजप सोबत नाही,असेही बच्चू कडू म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!