माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील अनेक भागात उद्यापासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवार ते सोमवार पावसाचे प्रमाण जास्त राहील. सोमवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्टही देण्यात आला.
हवामान विभागाने उद्या म्हणजेच शुक्रवारी नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज दिला. तर शनिवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि नांदेड तर खानदेशातली जळगाव, नंदूरबार आणि धुळे तसेच
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला.रविवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड तर खानदेशातील जळगाव, नंदूरबार आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर,
सातारा आणि सांगली. तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. सोमवारी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज असून संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो
अलर्ट देण्यात आला. तर खानदेश, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.