Tuesday, April 22, 2025

सर्व विदयापीठे,शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासाचा समावेश करावा- संभाजीराजे दहातोंडे

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

सर्व विदयापीठे, CBSE आणि ICSE शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासाचा समावेश करावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे कडे केली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दिलेल्या निवेदनात श्री.दहातोंडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक
अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात स्वराज्य स्थापनेचा धगधगता संदेश दिला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आजही ते लोकांसाठी प्रेरणादायक आदर्श आहेत.
आजच्या शिक्षण व्यवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास अत्यंत मर्यादित स्वरुपात होत आहे. विशेषतः CBSE आणि ICSE बोर्डाच्या अभ्यास क्रमांमध्ये त्यांची शिकवण आणि योगदान याबाबत माहिती अपुरी आहे. यामुळे विदयार्थ्यांना या थोर पुरुषाच्या कार्याचा सखोल अभ्यास करता येत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना अनेक अशक्यप्राय गोष्टी साध्य केल्या. त्यांच्या कार्याचा अभ्यास त्यांच्या दूरदृष्टी, तत्त्वनिष्ठा आणि राष्ट्रनिर्मितीच्या कल्पनांचा आदर्श समजावून घेणे महत्त्वाचे आहे.

* त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या पैलूंचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा…
१) हिंदू मंदिरांचे रक्षण: छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीयांना समान आदर देणारे होते. परंतु, तत्कालीन राजकीय परिस्थितीत हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी आपल्या सैन्याला आदेश दिले की कोणत्याही परिस्थितीत धार्मिक स्थळांवर हल्ला होऊ नये. अशा प्रकारच्या धोरणांमुळे त्यांचे धर्मसंरक्षणाचे तत्त्व अधिक अधोरेखित होते.
२) गनिमी कावा (गुरिल्ला युद्धतंत्र) छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांशी लढताना गनिमी कावा या युद्धतंत्राचा अवलंब केला. त्यांच्या या रणनीतीने मोठ्या सैन्याला पराभूत करण्याची क्षमता निर्माण केली. विदयार्थ्यांना हे शिकवणे महत्त्वाचे आहे, कारण है तंत्र केवळ युद्धाच्या क्षेत्रातच नव्हे तर जीवनातील अडचणीवर मात करण्यासाठीही प्रेरणादायी ठरते.
३) सर्वसमावेशक प्रशासन : त्यांनी हिंदू आणि मुस्लीम अशा सर्व धर्मीयांना आपल्या प्रशासनात महत्त्वाचे स्थान दिले. त्यांची धोरणे सामाजिक एकोपा आणि न्यायासाठी आदर्श होती.
४) सांस्कृतिक संवर्धनः शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत कला, साहित्य, आणि संस्कृती यांना मोठ्या प्रमाणाबर प्रोत्साहन मिळाले. त्यांनी मराठी भाषेला राजमाषेचा दर्जा दिला आणि स्थानिक परंपरांचे जतन केले.

*प्रस्तावित कृती*

* CBSE, ICSE आणि सर्व विदयापीठांच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील वरील महत्त्वाच्या पैलूंवर आधारित पाठांचा समावेश करावा.
* त्यांच्यावर आधारित विशेष कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रदर्शन आयोजित करावी.
* विदयार्थ्यांमध्ये त्यांच्या कार्यावर आधारित प्रकल्प तयार करण्यास प्रोत्साहन दयावे.
* सर्व विद्यापीठात व शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी.छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य हे विद्यार्थ्यांना नेतृत्व, देशप्रेम, सहिष्णुता, आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व पटवून देत्तील. आपण या विषयाला महत्त्व देऊन शिक्षण धोरणांत योग्य बदल कराल, अशी आम्ही आशा करतो. आपल्या सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहत आहोत.
CBSC पॅटर्न मध्ये इ.७ वी मध्ये फक्त एकच धडा आहे. ICSC पॅटर्न मध्ये इ ६वी मध्ये फकत एकच धडा आहे. कृपया दोन्हीही पॅटर्न मध्ये इ. १ली ते १२ वी पर्यंतच्या वर्गात इतिहसाचा सामावेष करावा.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!