नेवासा
तालुक्यातील करजगांव येथील हनुमान मंदीर ते माकोणे वस्ती रस्त्याच्या कामासाठी काही शेतकऱ्यांनी आडकाठी आणल्यामुळे १९ शेतकऱ्यांनी हनुमान मंदिर समोर आमरण उपोषण सुरु केलेले उपोषण जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता गणेश सवई व पी.जी. वाघ यांनी दिलेल्या लेखी आश्वासननंतर उपोषणकर्त्यांनी चौथ्या दिवशी उपोषण स्थगित केले आहे.
करजगांव येथील काही शेतकऱ्यांचे आडमुठेपणा जवळपास पाचशे एकर क्षेत्रावरील शेकडो शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं असल्याने येथे सुरु असलेले खडीकरण व डांबरीकरणाचे काम रखडलेले आहे.लाखो रुपयांचा निधी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुनिल गडाख यांनी रस्त्यासाठी देऊनही हे काम पुर्ण होऊ देत नसल्याचे तहसीलदार तसेच संबंधित बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आल्याने आठवडा भरात इस्टीमेट प्रमाणे काम करुन कुणावरही अन्याय होणार नाही तसेच ह्या रस्त्याचा फायदा तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार असून पाऊसळ्यात होणारी दैना येथील शेतकऱ्यांची थांबणार असून लेखी आश्वासन जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता गणेश सवई व राऊसाहेब वाघ यांनी दिल्याने उपोषण कर्त्यांनी चौथ्या दिवशी संदिप अण्णासाहेब पुराणे,सागर हिरालाल माकोणे ,गणेश चिंधे आदींना लिंबू पाणी देवून उपोषण सोडले.
सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि माणिकराव चौधरी यांनी याबाबत उपोषण शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेवून वरिष्ठांनकडे पाठपुरावा केला. त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दहिफळे,थोरात,जावळे यांनी बंदोबस्त ठेवला.
यावेळी भाऊसाहेब भाग्यवंत, माजी सरपंच चंद्रकांत टेमक, सतिश फुलसौंदर, सुहास टेमक, नामदेव फुलसौंदर शंकरराव पुराणे, संदिप पुंड, बाबासाहेब टेमक, मच्छिंद्र माकोणे,विजय साळुंखे प्रदिप माकोणे, प्रशांत माकोणे, दत्तात्रय चिंधे, कैलास पुराणे,दिलीप फुलसौंदर,बाळासाहेब टेमक, दिपक माकोणे, भाऊसाहेब टेमक, आदी उपस्थित होते.