माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही महिन्यांपासून झपाट्याने इंधन दरवाढ सुरु आहे. दिल्ली, मुंबई आणि पुण्यासह मोठ्या शहरातील सर्वच ठिकाणी पेट्रोलदराने ११० रुपयांचा टप्पा पार केला होता. यातील जवळपास सर्व मोठ्या शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली
असून, डिझेलनेही नवा उच्चांक गाठला होता. दरम्यान, यावरून मोदी सरकारवर टीका सुरु होती. केंद्राच्या या निर्णयानंतर भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले, तर विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत करत मोदी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, कर्जत जामखेडेचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. यात त्यांनी मोदी सरकारचे आभार मानले असून गॅस सबसिडीबाबतही विचार करण्याचा सल्लाही दिला आहे.रोहित पवार यांची फेसबुक पोस्टयात ते म्हणतात,
केंद्र सरकारने पेट्रोलवरील ५ तर डिझेलवरील १० रुपये दर कमी केल्याने राज्याचेही पेट्रोलवरील १ आणि डिझेलवरील २ रुपये दर कमी होईल. कदाचित देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी झटका दिल्यानंतर केंद्र सरकारला उशिरा
का होईना दिवाळीच्या निमित्ताने जाग आली हे महत्वाचं आहे, याबाबत आभार! आता इतक्या दिवसांनी जाग आलीच आहे तर महागाईने ‘गॅस’वर असलेल्या सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी गॅस सबसिडीबाबतही विचार करावा. तसंच #GST सह राज्याचा हक्काचा
थकीत निधीही वेळच्यावेळी द्यावा, ही विनंती! कोरोनाच्या काळात लोकं अडचणीत असताना आणि बेरोजगारी वाढली असतानाच पेट्रोल-डिझेलवर आजवरच्या इतिहासात सर्वाधिक कर केंद्र सरकारने या दोन-तीन वर्षांच्या काळात आकारला.
त्यामुळं तो तातडीने कमी करण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.