माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात मान्सूनने दक्षिण कोकणात जोरदार हजेरी लावली आहे. गोव्यासह कोकणातील काही भागात मान्सूनला सुरूवात झाली आहे.
यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने झोडपले. मुंबई, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काल पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याने राज्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे.कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, तसेच मध्य
महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात
तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आली आहे.राज्याच्या
विविध भागात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, मॉन्सून तळ कोकणात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात
आजपासून (ता. ११) जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागातही वादळी वारे, मेघगर्जना विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच तळ कोकण,
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.मान्सून दक्षिण उत्तर प्रदेशपासून पश्चिम आसामपर्यंत हवेचा
पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस होणार आहे. मध्य प्रदेशपासून आंध्रच्या किनारपट्टीपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टीलगत अरबी समुद्रसापाटीपासून
5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.